नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुक अधिकच रंगत चाललेली दिसत आहे. एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या
फैरी झाडण्यास सुरूवात झाली आहे. ओवेसी यांच्या नेतृत्वातील एआयएमआयएमनंही बिहार विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
एमआयएम बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून निवडणुक लढवणार आहे. एमआयएम च्या
निर्णयावर काॅंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे.
“ओवेसी भाजपाच्या सांगण्यावरून राजद-काॅंग्रेस महाआघाडीला नुकसान पोहोचवण्यासाठी स्वतंत्रपणे
निवडणूक लढवतील हे माझे म्हणणे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. भाजप आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे.
Owaisi-led AIMIM to contest Bihar Assembly elections with RLSP, BSP https://t.co/G6ymHVaVRC
-via @inshortsओवेसी भाजपा के कहने पर आरजडी कॉंग्रेस गठबंधन को नुक़सान पहुँचाने के लिए अलग से चुनाव लड़ेंगे। एक बार मैं फिर सही साबित हुआ। भाजपा और ओवेसी एक सिक्के के दो पहलु हैं।
— Digvijaya Singh (@digvijaya_28) October 7, 2020