नवी दिल्ली – भारत सरकारच्या नवीन माहिती तंत्रज्ञान नितीला होत असलेला विरोध अद्याप संपलेला नाही. मात्र राहुल गांधी यांनी बदललेलं ट्विटर धोरण सध्या चर्चेत आलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडरवरून आपले जवळचे मित्र, नेते आणि वरिष्ठ पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे राजकीय पटलावर चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये वॉयनाड मतदार संघातील कार्यालयातील संबंधीत लोकांना देखील अनफॉलो केलं आहे. त्यांनी दिल्लीतील अनेक पत्रकार आणि नेत्यांना अनफॉलो केलं.
राहुल गांधी आपलं ट्विटर अकाउंट रिफ्रेश करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एक सराव म्हणून हे केल्याचं राहुल यांच्या निकवर्तीयांनी सांगितलं. याला एखाद्या घटनेशी जोडणं संयुक्तीक होणार नाही. सध्या राहुल गांधी ट्विटरवरून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करताना दिसत आहेत.