मुंबई – रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असेही नवाब मलिक म्हणाले.
पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेते यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. त्या त्यांची ट्रान्स्फर झाल्याचे सांगत आहेत मात्र त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.