मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) हा अशा संघांपैकी एक आहे, जो पहिल्या सिजनपासून T20 लीग सतत खेळत आहे, परंतु अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. RCB 2009, 2011 आणि 2016 अशा तीन वेळा फायनलमध्ये पोहचली होती. आरसीबीचा 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सने, 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आणि 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने पराभव केला होता. महेंद्रसिंग धोनी आरसीबीचा कर्णधार असता तर संघाने आतापर्यंत तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली असती, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याला वाटते.
वसीम अक्रमने एका स्पोर्ट्स वेबसाइटशी बोलताना म्हंटले,”जर एमएस धोनी कर्णधार असता तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आतापर्यंत तीन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असत्या”. आरसीबीला चाहत्यांचा खूप पाठिंबा आहे. तसेच त्यांच्याकडे विराट कोहली हा जगातील अव्वल खेळाडू आहे, पण दुर्दैवाने त्यांना विजय मिळवता आलेला नाही. धोनी आरसीबीमध्ये असता तर त्यांना विजेतेपद मिळवून देण्यात मदत झाली असती असं स्पष्ट मत वसीम आक्रमणे व्यक्त केलं.
धोनीचे कौतुक केले
अक्रमने धोनीच्या कर्णधारपदाचेही कौतुक केले. तो म्हणाला की 41 वर्षीय धोनीला त्याच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हे माहित आहे. तो म्हणाला- धोनीला संघाचे नेतृत्व करण्याची सवय आहे. विराटलाही आता याची सवय झाली असेल, पण धोनीमध्ये हा गुण स्वाभाविक आहे. धोनी आतून शांत नाही पण तो शांत असल्याचे दाखवतो.
धोनीने कर्णधार म्हणून चार आयपीएल जेतेपदे पटकावले आहे. फक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्यापेक्षा एक अधिक म्हणजेच 5 वेळा विजेता ठरला आहे. दुसरीकडे, कोहली अजूनही त्याच्या कारकिर्दीत प्रथमच प्रतिष्ठित विजेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. 2008 मध्ये T20 लीग सुरू झाल्यापासून तो सलग 16 हंगाम एकाच संघाचा भाग आहे. त्याने 2013 ते 2021 पर्यंत आरसीबीचे नेतृत्व केले, परंतु कधीही विजेतेपद जिंकले नाही.