मुंबई – ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर काही आमदार सुरतेकडे गेले. त्यानंतर आणखी काही आमदार पुन्हा सुरतला गेलो.’
ते पुढे म्हणाले,’हे सर्व आमदार गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास केलाय. यासाठी त्यांचे २५ दिवस गेले. २७ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक दिवस दोघांनीच सरकार चालवल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला. पण अजून महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले नाहीत.’ असेही ते म्हणाले आहे.