मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, उद्योग, महिला, कामगार, सेवा, मागासवर्गीय या सर्व क्षेत्रात मागील पाच वर्षात राज्याची पिछेहाट झाली होती. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला.
सुविधांना प्राधान्य देणारा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा, ग्राम पंचायत बळकट करणारा, कोकणातील फळबागांना आणि मच्छिमारांना नवीन संधी देणारा, उद्योग आणि सेवा क्षेत्राला उभारी देणारा, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा देणारा, राज्याला आर्थिक शिस्त लावणारा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना व विकासाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे.