नवी दिल्ली : कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असताना भारत सरकारच्या एकत्रित प्रयत्नाचा भाग म्हणून भारतीय लष्कराच्या वतीने आणखी एक 1500 खाटांचा विलगता कक्ष उभारण्यात येणार असल्याचे लष्कराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जैसलमेर, सुरतगढ, सिकंदराबाद आणि कोलकाता यापैकी एका शहरात त्याची उभारणी करण्यात येईल. कोविद 19 चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक सूचना केल्या आहेत, त्याला प्रतिसाद देत भारतीय लष्कराच्या मुख्यालयाने तपशीलवार माहिती आणि ते तयार करण्याची तयारी दर्शवली आहे.
लष्कराच्या रुग्णालयात विलगता कक्ष आणि संशयितांच्या तपासणीसाठी स्वतंत्र ओपीडी उभारण्यात येईल. लष्करी रुग्णालय स्थानिक नागरी वैद्यकीय प्रशासनाशी ताळमेळ साधून आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सुचनांनुसार काम करतील, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत सर्व अनावश्यक समारंभ रद्द करण्याचे आदेश स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भारतात एकून 31 रुग्ण आढळले आहेत.