नवी दिल्ली – “माझ्यावर हल्ला करण्यासाठी खा. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला सुपारी दिली असून, तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला आहे. राऊतांनी हे पत्र ट्विटसुद्धा केले आहे. ट्विटटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. यावर आता माध्यमांशी बोलतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणं चुकीचे आहे. मात्र संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत. असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया केली आहे.