मुंबई – भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Sushma ji, me and crores like me would miss you for ever !
My heartfelt tributes.
And deepest condolences to family, friends, karyakartas, innumerable fans and followers.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रध्दाजंली वाहिली आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलंय की, भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे”.