कोलकाता – बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फणडवीसांना राष्ट्रीय राजकारणात स्थान देणार अशी चर्चा होती. या चर्चा आता खऱ्या होताना दिसत आहेत. बिहारनंतर फडणवीस यांच्याकडे पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी प्रभारीपद देण्यात आले आहे.
Started my rally #PoribortonYatra from Amtala in Satgachia assembly constituency (Diamond Harbour).
Witnessed massive response, support & affection in West Bengal towards @BJP4Bengal and Hon PM @narendramodi ji.#ModirSatheBangla #PoribortonInBengal pic.twitter.com/1FLJZEW4rr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 22, 2021
देवेंद्र फडणवीसांवर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस त्यासाठी सोमवारी पश्चिम बंगालमध्ये देखील दाखल झाले आहेत. त्यांनी याठिकाणी परिवर्तन यात्रेला सुरू केली आहे. याचे काही फोटो फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून शेअर केले आहेत, त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जय जय श्रीराम #ModirSatheBangla#PoribortonYatra @nityanandraibjp pic.twitter.com/xvYyunYOeS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 22, 2021
पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परत येणार नाही, असं सांगत येथे हिंदु नागरिक दुय्यम दर्जाचा बनला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना स्वत:च्या राजकारणासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.