नगर – महापालिकेच्या वर्धापन दिन व आषाढी एकादशीनिमित्त साई समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वसंत टेकडी येथील संदेश नगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात माजी महिला उपमहापौर गीतांजली काळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन हरित शहर करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी स्मिता पोखरणा, सरस्वती बिडवे, निकिता पोखरणा, विद्या भोपे, वैशाली पवार, अलका गडकर, अनुराधा कराळे आदीसंह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी काळे म्हणाल्या की, हरित शहर करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्षरोपण व संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश दिला असून, निरोगी आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. तसेच महापालिका असतित्वात आल्यापासून पाच महिलांना महापौर व उपमहापौरच्या माध्यमातून शहर विकासाची संधी मिळाली. महिलांनी हि जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर सुरेखा कदम, शीला शिंदे, उपमहापौर मालन ढोणे यांनी शुभेच्छा दिल्या.