पुणे – रायगडाहून पंढरपूरला दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे यंदा प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राज्याभिषेक शके, 347 या दिनी म्हणजे 6 जून रोजी सकाळी 8 वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी स्थानाहून होणार आहे. त्यानंतर 30 जून रोजी ही पालखी पंढरपूरला पोहोचेल तर, 4 जुलै रोजी पालखी पुन्हा रायगडावर येणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी मार्गावरील शाळांमध्ये होणारी भक्ती-शक्ती जागरण रिंगण सोहळा होणार नाही. अत्यावश्यक सामाजिक आरोग्य अंतर राखून जास्तीत जास्त शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास करतील. सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे विधी यावर्षी होणार नाहीत. रायगड ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवरायांच्या पादुकांना डोक्यावर घेऊन होणार आहे.