पुणे – करोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे साखरेची निर्यात ठप्प असली तरी इंडोनेशिया आणि इराणमधून साखरेला मागणी होत आहे. केंद्र शासनाच्या परवानगीनंतर लवकर या देशांमध्ये साखरेची निर्यात सुरू होईल, अशी माहीती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.
केंद्र सरकारने 2019 ते 2020 दरम्यान सुमारे 60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. आतापर्यंत फक्त 35 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. या निर्यातीवर केंद्र सरकारकडून प्रतिकिलो 10 रुपये 44 पैसे अनुदान देण्यात येत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर साधारणत: 45.50 लाख टन साखर निर्यात होईल, अशी शक्यता साखर उद्योगांकडून व्यक्त करण्यात येत आहे. देशात 30 एप्रिल पर्यंत 258 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.