-मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे माणसाचे हृदय. या हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, हृदयाचे शरीरास रक्त पुरविणे, रक्ताचे योग्य पकारे रक्ताभिसरण घडविणे. शरीर -सक्षम करणे, सर्व शरीरास सुरळितपणे रक्त पुरवठा होणे.
– शरीरास सुडौलपणा येणे, त्याच्या स्नायूंना बळकटी येणे.
-व्यवस्थित भूक लागणे व खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होणे, पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालणे.
– चांगली झोप येणे.
– शरीरातील मेद, चरबी, लठ्ठपणा कमी होणे
-मानसिक ताणतणाव कमी होऊन मन शरीर ताजेतवाने व अधिक कार्यक्षम होणे.
– वाढत्या वयाबरोबर होऊ पाहणारे, मधुमेह, हृदयरोग, कंपवात ह्या सारख्या व्याधी होण्याची शक्यता कमी करणे.
वरीलप्रमाणे शारीरिक क्षमतेच्या वाढीसाठी व्यायामाची असणारी गरज लक्षात घेऊन आरोग्यतज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर्स आणि अनुभवी व्यक्ती ह्यांच्याकडून जे व्यायामाचे प्रकार करावेत.
-हृदयाची सबलता वाढविण्यासाठी धावणे, जलद गतीचे चालणे, दोरीवरच्या उड्या मारणे. पोहोणे, सायकल चालविणे अशा प्रकारे व्यायाम करावेत.
-स्नायूंच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या सुडौलतेसाठी झाडावर चढणे, उठाबशा काढणे, जोरबैठका मारणे पुलअप्स काढणे, झोके घेणे, यासारखे व्यायाम करावेत.
– हाडे मजबूत होण्यासाठी दोरी वरच्या उड्या मारणे, मैदानी खेळ खेळणे, धावणे, पळणे यासारखा व्यायाम करावा.
वरील प्रकारचे व्यायाम हे थोडे थोडे पण रोज करायला हवेत. सूर्य नमस्कार आणि चालणे हे सर्वात सोपे व्यायाम प्रकार असून ते फार उपयुक्त आहेत. एका सूर्यनमस्कारात अनेक प्रकारच्या शारीरिक हालचाली होत असल्याने सूर्य नमस्कार घालणे हा एक प्रभावी व्यायामप्रकार मानला गेलेला आहे. आपण व्यायामामध्ये सातत्य राखले तरच त्याचा फायदा होऊ शकतो.
कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम केल्यावर काही गोष्टीची विशेष खबर दारी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
– व्यायामाने घाम आला असता त्यावर वारा बसू देऊ नये.
– व्यायाम झाल्यावर थोडी विश्रांती अवश्य घ्यावी.
– व्यायाम केल्याने घाम येतो शरीरातील पाणी बाहेर जाते, त्यामुळे तहान लागते, पण व्यायाम केल्याकेल्या पाणी पिऊ नये.
या संदर्भात एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की इथे “पी हळद अन् हो गोरी’ असे घडत नाही. त्यासाठी व्यायामातले सातत्य, आहाराची बंधने, ह्या गोष्टीपण पाळाव्या लागतात. तरच आपल्याला आनंदी आणि स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्याची साथ मिळते.