नवी दिल्ली – होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार देशातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास भेट देणार आहे. केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे. सरकार होळीपूर्वी ही घोषणा करू शकते. 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. सध्या महागाई भत्ता (DA) 31 टक्के आहे, तो आता ३४ टक्के करण्यात येणार आहे. अशातच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे. सरकारने ही वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सरकारने डीएमध्ये 3 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. गेल्या ऑक्टोबरमध्ये ही वाढ 3 टक्के आणि जुलैमध्ये सुमारे 11 टक्क्यांनी करण्यात आली होती. आता सरकारने त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली तर ती 34 टक्क्यांवर पोहोचेल. AICPI च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये देशातील महागाई दर 34.04% वर पोहोचला आहे.