नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले असून ते तीव्र वादळाच्या श्रेणीत रुपांतर झाले असल्याचे सांगण्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र आता हे चक्रीवादळाने मार्ग बदलला असून हे उत्तर-ईशान्य दिशेने पुढे जात आहे.
‘बिपरजॉय’ तौक्ते चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 175 किलोमीटरहूनही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाच्या अंदाजे मार्गात बदल झाला आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे.
११/०६:अरबी समुद्रावरील बिपरजॉय अत्यंत तीव्र चक्री वादळ झाले:सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला चक्रीवादळ इशारा (पिवळा संदेश):
सकाळी 5.30 वा मुंबईपासून 580किमी
सौराष्ट्र-कच्छ व लगत पाकिस्तानच्या किनारपट्टीला १५/०६ दुपारी मांडवी-कराची दरम्यान ओलांडण्याची शक्यता;वारे 125-135kmph-150 kmph— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.’
15 जूनपर्यंत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील चार राज्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकणार नसलं तरी, याचा परिणाम देशात जाणवणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.गुजरातला सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.