नवी दिल्ली : कोरोनामुळे देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत भारताच्या तमाम जनतेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजेच संचारबंदी पाळून देश कोरोना विषाणूमुक्त होण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे. देशाच्या नागरिकांनी प्रशासन यंत्रणांना या संपूर्ण दिवसभरात सहकार्य करणे अभिप्रेत आहे. मोदींबरोबरच देशातील अनेक बडे लोक, चित्रपट, मालिका आणि माध्यम कलाकारांनी देखील सोशल मीडियाद्वारे पुढाकार घेऊन जनता कर्फ्यू पाळण्यात सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे.
जनता कर्फ्यू शुरू हो रहा है…
मेरी विनती है कि सभी नागरिक इस देशव्यापी अभियान का हिस्सा बनें और कोरोना के खिलाफ लड़ाई को सफल बनाएं।
हमारा संयम और संकल्प इस महामारी को परास्त करके रहेगा। #JantaCurfew pic.twitter.com/p5onFBSoPB
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. आहात तिथेच पुढील काही दिवस राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर हिंदीतून लिहिलेल्या ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे कारण नसेल तर घरातून बाहेर पडू नये, असेही आवाहन केले आहे.
राज्यात शनिवारपर्यंत करोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६४ झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत आहेत. यामुळे इथल्या प्रत्येक जनतेनं कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.