सोरतापवाडी (वार्ताहर) –7 मे रोजी पुणे जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी पहिली रेल्वे रवाना झाली. आता दररोज रेल्वे सोडणार असल्याचा गैरसमज परप्रांतीय मजुरांना झाला व ते काल तीनशेहून अधिक मजूर उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशनवर जमा झाले.
जिल्हा प्रशासन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे परप्रांतीयांना त्यांच्या घरी जाण्यासाठी उरुळी कांचन रेल्वेस्टेशनची निवड केल्याने परप्रांतीयांचा गैरसमज होऊन ते पुण्यातील कोंढवा, कात्रज, मुंढवा, हडपसर अशा अनेक भागातून लोक रेल्वे ट्रॅक मार्गे पायी उरुळी कांचन येथे आले. पण रेल्वे नसल्याने ते तिथेच थांबले त्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून सागर कांचन व मयूर कांचन यांनी अचानक 300 लोकांची जेवणाची सोय केली व लहान मुलांना बिस्किट पुड्याचे वाटप देण्यात आले.
लहान मुलांना जाताना पुन्हा जेवणाची सोय केली. त्यांना पुन्हा कात्रज, कोंढवा, मुंढवा, हडपसर येथील घरी जाण्यासाठी 4 गाड्यांची सोय करून सुखरूप घरपोच केले. यावेळी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, संदीप कांबळे, उपसरपंच जितेंद्र बडेकर, ग्रामसेवक कैलास कोळी, अर्जुन कांचन, पोलीस नाईक सोमनाथ चित्तारे, शिपाई सचिन पवार, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र बाठे, संदीप गव्हाणे, सदाशिव भागेपल्ले यांनी मोठी मदत झाली.