चंदीगड – अभिनेत्री कंगना रणावत आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायमच चर्चेत असते. भाजपला अनुकूल अशा विधानांमुळे अनेकदा कंगनाला टीकेला सामोरं जावं लागतं. काही दिवसांपूर्वीच तिने आंदोलक शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. आता कंगनाने आपल्यावर जमावाने हल्ला केल्याचा दावा केला आहे. पंजाबमधून हिमाचालमध्ये येत असताना हा हल्ला झाल्याचा आरोप तिने केला आहे.
कंगनाने शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर ‘जिहादी देश’ शेतकऱ्यांना संबोधलं होतं. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त कऱण्यात आला होता.
दरम्यान कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यातच कंगनाला आता असंतोषाला सामोरं जाव लागलं आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की,”मी पंजाबमध्ये प्रवेश करत असताना एका जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत”. या संदर्भातील व्हिडीओ देखील कंगनाने शेअर केला आहे.
“पंजाबमध्ये पोहोचताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला आहे. हे लोक स्वतःला शेतकरी असल्याचे म्हणवून घेत आहेत. देशात सुरक्षा नसेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, तर हे खूप भयंकर आहे, असंही कंगनाने म्हटलं.