कोल्हापूर (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या उद्याच्या मुंबईतील मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका केलीय. कोण कशा पद्धतीने आंदोलन करतं हा ज्याचा त्याचा भाग आहे , मात्र रोग हाल्याला आणि इंजेक्शन पकालीला अशा पद्धतीने लोक करतात अशी टीका राजू शेट्टी यांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी टीका केलीय.
कोल्हापुरच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना लक्ष केलंय. सदाभाऊ खोत म्हणाले की, आदानी आणि अंबानी यांनी जास्त भाव दिला आणि तो जर आम्हाला परवडला तर आम्ही त्याचा माल विकू. जगाच्या बाजारपेठेत कोणीही आला आणि आम्हाला दर जास्त दिला तर आम्ही त्याला माल विकू.. स्पर्धेला कोण घाबरतय अस खोत यांनी म्हटलंय. तसंच कडकनाथचा विषय चघळून चघळून चोथा झालाय असही खोत यांनी स्पष्ट केलंय.