मुंबई – पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक आग्रवाल याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्याचे नेतृत्व अपयशी ठरत आहेच पण त्याची वैयक्तीक कामगिरीही सुमार होत आहे. त्यामुळे त्याच्यावर समालोचक आकाश चोप्रा यांच्यासह अनेकांनी टीका सुरु केली आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीतही तो 4 धावा काढून बाद झाला. त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगळुरुविरुद्ध तो 32 धावाच करु शकला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने केवळ 1 धाव केली होती. तीन सामन्यांतून एकच विजय त्यांच्या पदरात पडला होता. त्यामुळे सध्या तो टीकेचा धनी होत आहे.