शिरूर – लॉकडाऊनच्या काळात शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत 340 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे सत्र सुरू आहे. अनेक दुकानदार यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन भादंवि 188 प्रमाणे 340 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत कलम 65 (इ) प्रमाणे 39 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडून विनाकारण मोटरसायकलवर फिरणाऱ्या 27 दुचाकी चालकांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तर तीन चार चाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. शिरूर शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 24 जणांना लॉक डाऊन काळामध्ये तडीपार केले असल्याचेही पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.
शिरूर शहरात व तालुक्यात पोलीस स्टेशनचे अधिकारी आपले कर्तव्य बजावत असून ठिकाणी नागरिकांना करोना व्हायरस आजाराबद्दल जनजागृती व बाहेर पडू नय, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.