मुंबई – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण सक्रिय झाले असून दिवसागणित अधिकाधिक वाढ होताना दिसत आहे. आज (दि. 4 एप्रिल) 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज राज्यात 711 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Covid19 | 711 fresh infections and 4 deaths in Maharashtra today; Active caseload stands at 3,792 in the state pic.twitter.com/qfpeS0MsIB
— ANI (@ANI) April 4, 2023
सध्या राज्यातील मृत्युदर हा एक 1.82% इतका आहे. तर दुसरीकडे आज 447 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79. 94. 060 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण 98.13% इतके झाले आहे.
दरम्यान, बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दिवसांपूर्वीच केलं आहे. तसेच, नागरिकांनी देखील या नियमांचं पालन करून आपल्या स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.