मुंबई – राज्यातील करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्राला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. मात्र काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवण्याची चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाली. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. मात्र त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतेली, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Vaccination for 18-44 age group has been suspended for the time being due to shortage of vaccines. All the doses purchased by the state government for the age group will now be diverted for the 45+ category: Maharashtra Health Minister Rajesh Tope after state Cabinet meeting pic.twitter.com/hZIoJqqevP
— ANI (@ANI) May 12, 2021
या व्यतिरिक्त राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून लस मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडे लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यास उशीर होत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगासाठी खरेदी केलेली लस काही कालावधीसाठी ४५ वर्षांवरील गटातील व्यक्तींना देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितले.