मुंबई – राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात रविवारी आणखी 11,877 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दोन हजार 69 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी करोनावर मात केली आहे.
यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका आहे. राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.