नागपूर – संत्र्यांच्या बागेत तोडणीसाठी महिला मजरांना घेऊन जाणारा पीकअप झाडाला धडकल्याने चार जणींचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात पहाटे हा अपघात घडला. या अन्य पाच महिला गंभीर जखमी झाल्या.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर रविवारी पहाटे हा अपघात झाला. परिसरातील संत्र्याच्या बगिच्यात संत्री तोडण्यासाठी महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या.
पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये तिघी जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे अशी मृांची नावं आहेत. इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.