नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. सरकारकडून विवध उपाय अवलंबले जात आहेत. मात्र, अजूनही त्यावर आपण नियंत्रण मिळवले नाही आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांची ओळख पटविण्यासाठी आणि या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टेस्ट करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशातील संपूर्ण चाचणी किट पोहचवण्यास प्राथमिकता दिली जात आहे.
आयसीएमआरकडून दररोज संपूर्ण देशात एक लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या महत्त्वपूर्ण कामात आता भारतीय टपाल विभाग मुख्य भूमिका निभावणार आहे. भारतीय डाक विभाग आणि आयसीएमआर यांच्यामध्ये एक करार करण्यात आला आहे. या कार्यात पोस्ट ऑफिस पुन्हा एका करोना वॉरियर्स बनले आहे. या करारानुसार आता पोस्ट ऑफिस आरसीएमआर कडून ठरवून दिलेल्या 200 अतिरिक्त लॅबना पुरवठा करणार आहेत. या अंतर्गत भारत पोस्ट आपल्या 16 प्रादेशिक ऑफिसमधून चाचणी किट डिलिव्हर करणार आहेत.
यासाठी डाक विभाग आणि आयसीएमआरकडून या कामासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक काही करण्यात आली आहे. म्हणजे करोना टेस्ट किट वेळेत सगळीकडे पोहचण्यास मदत होईल. डाक विभागाने हे काम सुरू केले असून आतापर्यंत कोलकाता, रांची, जोधपूर, अजमेर, कोटा, गुवाहाटी, आयजल आदी ठिकाणी हे किट पाठवण्यात आले आहेत. तसेच हे किट पाठवताना विशेष काळजी घेतली जात आहे. हे किट खराब होऊ नयेत म्हणून ती बर्फाने पॅक केली जात आहेत.