नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 151 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी भारतातील मंदिर दर्शन आणि तीर्थक्षेत्रावर बंदी घातली जात आहे.
दरम्यान, बुधवारपासून वैष्णो देवी यात्रेला स्थगिती दिली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये येणार्या सर्व आंतरराज्यीय बसगाड्यांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
वैष्णो देवी मंदिर व्यवस्थापनानाने रविवारी प्रसिद्धी पत्रक काढत विदेशी नागरिकांना २८ दिवसांपर्यंत मंदिरात न येण्यास सांगितले आहे. नागरिकांना खोकला, ताप, श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे आढळल्यास प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले आहे.