नवी दिल्ली – देशात सन 2020 या वर्षात कोविडमुळे जवळपास सर्वच क्षेत्रात संकटाचा सामना करावा लागला असला तरी देशातील अंतर्गत सुरक्षा स्थिती पूर्ण नियंत्रणात राहिली, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे.
देशातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांचा तपशील देताना गृहमंत्रालयाने अहवालात निदर्शनास आणले की देशाच्या मध्यभागी असलेला दहशतवाद, डाव्या विचारसरणीचा नक्षल किंवा माओवाद, ईशान्येकडील बंडखोरी, अशा साऱ्या स्थितीला समर्थपणे तोंड देत अंतर्गत सुरक्षा नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
भारत सरकारने अंतर्गत सुरक्षा वाढविण्याला योग्य प्राधान्य दिल्याचे नमूद करून, अहवालात असे म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अंतर्गत सुरक्षा आघाडीवर लक्ष केंद्रित करणे, पूर्वोत्तर राज्यांमधील सुरक्षा परिस्थिती सुधारणे, डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांशी लढा देणे आणि या वर्षात यावर लक्ष केंद्रित केले गेले.