पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठेकेदारी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई व स्वच्छता केली जाते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी या लॉकडाऊन काळातही ते कार्यरत असताना वेतन मिळत नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे वेतन थकविणाऱ्या ठेकेदारावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
विशेष करुन समाविष्ट गावांमध्ये व उपनगरा मधील प्रभागामध्ये ह्या प्रकारच्या ठेकेदारांकडुन साफसफाई करणारे कर्मचारी पुरविले जातात.त्याचप्रमाणे पुणे शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभुमी पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती,उद्यान, दवाखाने,क्षेत्रीय कार्यालये व खेळाचे मैदान सर्वच महानगरपालिकेच्या मालकीच्या वास्तु मध्ये ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत.
अशा ठेकेदारी पध्दतीने नेमलेल्या सफाई कामगार व सुरक्षा रक्षकांना गेले तीन महिने त्यांच्या नियमानुसार मासिक वेतन दिले जात नाही. त्याच बरोबर सध्या कोरोना विषाणुला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे.या परिस्थितीत सुध्दा आपण या आरोग्याची व जिवाची पर्वा न करता ही मंडळी प्रामाणीकपणे आपली काम करत आहेत. या गंभीर परिस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याला सुरक्षेच्या दुष्टीकोणातुन ठेकेदाराकडुन मास्क,हॅन्ड ग्लोज,डोक्यावरील कॅप ,सॅनिटाईझर ,बुट, इत्यादी आवश्यक वस्तु पुरविल्या जात नाहीत.
अशा परिस्थितीत सुध्दा हे कर्मचारी आपली जबाबदारी प्रामाणीक पणे पार पाडत आहे. असे प्रामाणीक पणे काम करीत असताना त्यांना तीन-तीन महिने त्यांचे वेतन (पगार) दिला जात नाही.अश्या परिस्थिती मध्ये या कर्मचा-यांनी आपले जीवन व कृटुंब कसे सावरायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे ठेवलेला आहे.
तसेच अनेक कामगारांना उपासमारीची वेळे आलेली आहे. वारंवार तक्रार करुन कधीतरी एखाद्या महिन्याचा पगार दिला जात आहे. तसेच जर पगाराबाबत तक्रार केली तर त्या कर्मचा-यांना हे ठेकेदार शिवीगाळ व दमदाटी करत आहे.त्यामुळे तातडीनं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही धुमाळ यांनी केली आहे.