पुणे : जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र असल्याची टिका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली आहे. एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्या मागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांनी केला होता. त्याला, घाटे यांनी प्रत्यूत्तर देत काॅंग्रेसवर जोरदार टिका केली आहे.
घाटे म्हणाले की, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही. ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही असा उलट घाटे यांनी काॅग्रेसवर केला आहे. तसेच एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले.