जळोची -बारामती शहरात लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवार (दि. 22) पासून सर्व दुकाने दुकाने, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
बारामती शहरातील सर्व व्यवहार पुर्ववत व्हावेत, ही मागणी अनेक दिवसांपासून व्यापारीवर्गाची होती. त्यानुसार व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून रविवारी (दि. 21) निवेदन दिले. व दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवुन मिळावी, म्हणून आग्रही मागणी केली. बरोबर एक महिन्यापूर्वीच दि. 22 मे रोजी सर्व दुकाने, सकाळी 9 ते 5 पाच या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार बारामतीमधील सर्व व्यापारी उद्योग व व्यवसायिकांनी, बारामती पॅटर्नच्या नियमांची काटेकोरपणे अमंलबजावणी करुण काळजी घेऊन व नियमांच्या अधीन राहून दुकाने सुरु केली होती.
बारामती आमराई परिसरामध्ये एक 29 वर्षीय महिलेला, करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतरही शहरातील परिस्थिती चांगली असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या महिले व्यतिरिक्त करोनाचा एकही रुग्ण बारामतीत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये.यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बारामती येथील एमआयडीसी व इतरत्र कामावर जाणारे याची कामावरुन, येणाऱ्यांची सायंकाळी पाच वाजल्यानंतर सुट्टी होत असल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. याचाही विचार करण्यात आला व निर्णय घेण्यात आला.
हॉटेल, सलून, लॉज, जिमही सुरू करा
बारामतीमधील सर्व व्यापारी दुकांदारांना परवानगी दिलेली असताना लॉज, सलून, हॉटेल, जिम, या व्यावसायिकांना मात्र, कसलाही दिलासा प्रशासनाने दिला नाही. तरी आम्हालाही परवानगी द्यावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.