नवी दिल्ली – राजस्थानातल्या कॉंग्रेस सरकारमध्ये पायलट आणि गेहलोत गटांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असून गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सचिन पायलट यांची बेशिस्त खपवून घेणार नाही. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे, असे म्हंटले आहे.
अविनाश पांडे म्हणाले कि, मी स्वतः सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अनेक संदेशही पाठवले. मात्र, सचिन पायलट उत्तर देत नाहीत. ते पक्षापेक्षा मोठे नाही. पक्ष त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार आहे. मात्र, बेशिस्त खपवून घेणार नाही. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे.
कॉंग्रेसच्या कोणत्याही आमदार किंवा आघाडीच्या आमदारांना काही समस्या असल्यास ते माझ्याशी येऊन बोलू शकतात आणि आम्ही यावर तोडगा करू शकतो. ही जबाबदारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी माझ्यावर सोपवली आहे, असेही अविनाश पांडे यांनी सांगितले.
Congress Pres Sonia Gandhi has specially assigned me a work saying that if any Congrees MLA or any alliance MLA have any problem or want to discuss their problem, they can come and talk to me and we can work on it: Rajasthan Congress in-charge Avinash Pandey to ANI. (File pic). pic.twitter.com/7tzLt1eIaH
— ANI (@ANI) July 13, 2020
दरम्यान, भाजपकडून राजस्थान सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप गेहलोत यांनी केला होता. मात्र भाजपने हा आरोप फेटाळला आहे. मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील सत्तासंघर्ष हा केवळ विकासाच्या मुद्दयामुळेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेत्याला पाठवल्यापासूनच ही रस्सीखेच सुरू झाल्याचे भाजपने म्हटले आहे.