नवी दिल्ली – निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करणारी एसबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाचने फेटाळली आहे, त्या निर्णयाचे कॉंग्रेसने स्वागत केले आहे. पक्षाने म्हटले की सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला १२ मार्च रोजी कामकाजाच्या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले.त्यावर प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे सरचिटणीस, संघटनेचे के सी वेणुगोपाल म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला या राजवटीच्या कुटिल कारस्थानांपासून वाचवण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
एसबीआयच्या तपशीलातून आपले सगळे जुने सांगाडे बाहेर येण्याची सरकारला भीती वाटत आहे, त्यामुळेच त्यांनी हा तपशील दडवण्याचा आटापिटा केला पण तो कोर्टाने हाणून पाडला आहे.
वेणुगोपाल म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने प्रमाणित केल्याप्रमाणे हा महा भ्रष्टाचार घोटाळा भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट कॉर्पोरेट मालकांमधील अपवित्र संबंध उघड करेल.”