Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लखनऊमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. यासोबत न्यायालयाकडून केरळमधील वायनाडचे लोकसभा खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस देखील पाठवली आहे. तसेच हे प्रकरण एमएलए न्यायालयाच्या विशेष न्यायाथीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे.
या प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल फौजदारी खटला रद्द करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाचा आदेशाविरोधात जिल्हा आणि सत्र व्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांच्या कोर्टात दाद मागण्यात आली. ही याचिका स्वीकार करत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील लोकांना नोटीस जारी करत याचिका एमपी एमएमए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले. या प्रकरणी एक नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
तक्रारकर्ते नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत मुख्य न्याय दंडाधिकारी तृतीय यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये विरोधकांकडून भारत जोडो यात्रेत विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.
कनिष्ठ न्यायालयाने प्रथम हा अर्ज तक्रार म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु नंतर ही तक्रार अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत फेटाळण्यात आली. दरम्यान कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला देखरेख याचिकेद्वारे (monitoring petition) आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.त्यामुळे आता सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.