इंफाळ – राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला राज्याची राजधानी इंफाळऐवजी १४ जानेवारी रोजी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील एका खाजगी मैदानातून हिरवा झेंडा दाखविला जाईल.
काँग्रेसचे मणिपूरचे अध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी सांगितले की, कॉंग्रेसने इम्फाळमधील हप्ता कांगजेबुंग मैदानातून यात्रा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती, परंतु राज्य सरकारने काही अटींसह परवानगी दिली त्यामुळे शेवटच्या क्षणी स्थळ बदलण्यास भाग पाडले.
भारत जोडो न्याय यात्रेला झेंडा दाखवण्यासाठी इंफाळमधील हप्ता कांगजेबुंग सार्वजनिक मैदानाला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आम्ही 2 जानेवारीला राज्य सरकारला दिला होता. असे ते म्हणाले.
आम्ही १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना या संदर्भात भेटलो पण परवानगी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले. नंतर रात्री, एक आदेश जारी करण्यात आला ज्यात हप्ता कांगजेबुंग मैदानाला परवानगी दिली परंतु लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली.
मेघचंद्र म्हणाले की, प्रदेश काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पुन्हा मुख्य सचिव विनीत जोशी तसेच डीजीपी राजीव सिंह आणि उपायुक्त (डीसी) यांची या संबंधात भेट घेतली. आम्हाला सांगण्यात आले होते की १००० पेक्षा जास्त लोकांना कार्यक्रमस्थळी परवानगी दिली जाणार नाही.
परवानगी न मिळाल्याने आम्ही चिंतेत होतो. पण गुरुवारी रात्री उशिरा, थौबल डीसी यांनी एका खाजगी जागेवरून यात्रेला झेंडा दाखविण्यास परवानगी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तेथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील, असे ते म्हणाले.
या यात्रेचा समारोप मुंबईत होणार असून ही यात्रा ६७ दिवस चालणार आहे. त्यात १५ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून ६७१३ किमी अंतर कापले जाणार आहे.