हडपसर – सध्याच्या वातावरणात सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार वाटतो. स्वातंत्र्यापासून आम्ही जो बंधु भाव जोपासला होता, तो सत्तेत बसलेला पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आपल्याला वाचवायची असेल तर भविष्यात आपल्याला या पुरोगामी विचारांची भूमिका घेऊन पुढे जावे लागेल.
असे मत माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने जन संवाद यात्रा हडपसर गांधी चौक येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवरकर बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, कमल व्यवहारे, पूजा आनंद, माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर, विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, प्रशांत मामा तुपे, पल्लवी सुरसे, उर्मिला आरु, प्रकाश पवार ,प्रशांत सुरसे, शफीभाई इनामदार ,शहाजी मगर ,गणेश फुलारे ,विजय जाधव ,इंदिरा तुपे माऊली तुपे,
मंदाकिनी नलावडे, पुष्पा गायकवाड, बाळासाहेब हिंगणे, वसंत शेवाळे, पल्लवी सुरसे, माया डुरे ,संजय डोंगरे ,सुलतान खान,नितीन आरु, आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटी व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या वतीने या जनसंवाद यात्रेचे संयोजन करण्यात आले होते. भाजपने हुकूमशाही सुरू केली आहे. परंतु काँग्रेसचा विचार कोणीही संपू शकणार नाही. जनता आता भाजपच्या सरकारला कंटाळलेली आहे. त्यामुळे येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल .असा विश्वास काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.