नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ८९६ नवे रुग्ण सापडले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांमध्ये २४ तासात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६७६१ वर जाऊन पोहोचली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचे ६०३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याखेरीज कोरोना आजारातून पूर्ण बरे झालेले ५१६ तर या रोगाने २०६ रुग्ण दगावले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या देशामध्ये सर्वाधिक असून राज्यातील एकूण १३६४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
37 deaths, 896 new cases in last 24 hours, the sharpest ever increase in cases; India’s total number of #Coronavirus positive cases rises to 6761 (including 6039 active cases, 516 cured/discharged/migrated and 206 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/HbQKf5BMPt
— ANI (@ANI) April 10, 2020