कोल्हापूर – राज्याचे आजी आणि माजी मुख्यमंत्री कोल्हापूरात पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दरम्यान दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना एकमेकांसमोर आले आहेत. शाहुपुरी मध्ये या दोघांची योगायोगाने भेट अचानक झाली आहे.
या भेटी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद झाला आहे. त्यानंतर दोन्हीही नेते घटनास्थळावरुन निघून गेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याच परिसरात असल्याचे कळाल दरम्यान त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा, एकत्र पहाणी करु असा आग्रही ठाकरेंनी धरला. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहुपुरीतच थांबले आणि दोघांची भेट झाली.
मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूराच्या मुद्द्यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे, इतक्या कमी वेळात आश्वासन देता येत नाही. त्यांनी बैठक बोलावली तर आम्ही येण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.