आतपार्यंत 51 हजार नागरिकांचे केला बचाव
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे सर्वांचेच हाल होत आहे. राज्यात काही ठिकाणी पुरपरिस्थिती अजूनही कायम आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त या पुराचा फटका बसला आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी जवळपास 53 फुटांनी वाढलेल्या अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील पुराची गंभीर स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.
CM @Dev_Fadnavis chaired a meeting in Mumbai to review flood situation in various parts of Maharashtra.
Ministers Chandrakant Patil, Girish Mahajan, Subhash Deshmukh, Eknath Shinde, Ramdas Kadam & senior officials were present. pic.twitter.com/ne09XqrX8O— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 7, 2019
मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुराची माहिती जाणून घेतली. बैठकीअगोदर पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला. या भागात एनडीआरएफच्या 22 टीम दाखल झाल्या आहेत. तसेच 80 भारतीय जवानदेखील दाखल झालेत. करवीर, शिरोळमधील 8 गावं पुरात बुडाली आहेत. सांगलीतील राजाराम बंधाऱ्यातून पाणी वाहू लागल्या लागल्याने 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगली 307 टक्के पाऊस झाला आहे. महिला, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देत आहे.