CM Eknath Shinde : मोदी मोदी असा जयघोष देशभरात होऊ लागला आहे. विकसीत भारताची निर्मिती मोदींकडून केली जात आहे. हर घर मोदी नाही तर आता मन मन मोदी है ! त्यामुळे विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे. अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ अशी विरोधकांची अवस्था झालेली आहे. 2014, 2019 या तिन्ही निवडणूकीच्या काळात लोकांनी विरोधकांना नाकारले. 2024 मध्ये देखील लोक इंडिया आघाडीला नाकारून पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकारला सपोर्ट करणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महायुतीचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्राचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधी पक्ष मोदींवर वारंवार आरोप करतात. पण मोदी त्यांच्याकडे जराही लक्ष देत नाहीत. मोदी त्यांच्याकडे जराही फिरकले तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून फेस बाहेर येईल. पण एक म्हण आहे, हाथी चले बाजार,…., विरोधी पक्ष जेवढी मोदींवर टीका करणार तेवढी जनता त्यांना मतदान करेल. आता सर्व रेकॉर्ड मोदी तोडतील. कारण देशाची 40 कोटी जनता मोदींसोबत आहे. त्यामुळे एनडीएकडे आत्मविश्वास तर इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाच्या दिशेला नेतो तर अहंकार विनाशाकडे नेतो. त्यामुळे प्रभू रामांनी अहंकारी रावणाचा विनाश केला होता”, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.