पिंपरी (प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशन व भारत सरकार संस्कृती मंत्रालय, दिल्ली मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त दुसऱ्या टप्प्यातील ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
संयुक्त या अभियानाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड इ क्षेत्रीय कार्यालय विभाग अधिकारी राजेश आगळे, माजी नगरसेविका विनाया तापकीर, प्रकाश काळजे, माजी महापौर नितीन काळजे, दाभाडे सरकार, अजित बुर्डे, सेवादल संचालक बाबासाहेब कमाले, ॲड संतोष मोरे, संजय फुले व संत निरंकारी मंडळ भोसरीचे मुखी अंगद जाधव यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रकाश पाटोळे,सचिन महानोर, मनिराम शर्मा, विठ्ठल शिंदे, हेमंत तांबे सर, शितोळे मामा गंगाधर देशमुख, प्रशांत झगडे, तानाजी उगाने व पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या अभियाना मध्ये चऱ्होली बु.नदीच्या पाण्यात पडलेला प्लॅस्टिक कचरा, सेंद्रिय कचरा अनावश्यक झुडपे, जलपर्णी, शेवाळे लाकडी काटेरे वापरून काढण्यात आले.
संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी सांगितले की, निरंकारी ‘सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने ही अमृत परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९०० शहरांमध्ये जवळपास १६०० हून अधिक ठिकाणी राबविण्यात आली.