नवी दिल्ली – अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून येणाऱ्या आणि सध्या गुजरातच्या दोन जिल्ह्यांमध्ये राहात असलेल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन आणि पारशींना नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारताचे नागरिकत्व दिले जाण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) 2019 ऐवजी नागरिकत्व कायदा 1955 अन्वये हे नागरिकत्व बहाल करण्याचा हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जातो आहे.
अभिनेत्री कंगनाचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित; हिमाचलमधून लोकसभेवर पाठवणार? https://t.co/73G5X8ohJW
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 1, 2022
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी देशांतून येणाऱ्या वर नमूद केलेल्या धर्मांच्या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद सीएएमध्ये आहे. मात्र, त्याची नियमावली अद्याप तयार केली गेली नसल्याने आतापर्यंत कोणाला नागरिकत्व प्रदान केले गेलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार गुजरातच्या आनंद आणि मेहसाना जिल्ह्यांत राहात असलेल्या आणि त्या तीन देशांतून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.