मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. हा वाद एवढ्यातच थंडावेल असं वाटत नाही.
अश्यातच आता उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून, त्यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते … घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 8, 2023
आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, “ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते… घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला.. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते.. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये.!” या आशयाची पोस्ट आव्हाडांनी केली आहे.