नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे तुणतुणे चीनकडून अजूनही सुरू ठेवले गेले आहे. अरुणाचल प्रदेशबाबकता चीनचा दावा भारताने यापूर्वी अनेकदा स्पष्ट शब्दात फेटाळून लावला असला, तरी चीनकडून पुन्हा पुन्हा तो दावा केला जातो आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारीच चीनचा दावा सपशेल फेटाळून लावला होता.चीनचा हा दावा हास्यास्पद असून अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जयशंकर म्हणाले होते.
चीनच्या दाव्यामध्ये आश्चर्य वाटावे असे काहीही नाही. चीनने यापूर्वी देखील असे हास्यास्पद दावे केले आहेत. हे दावे बारताने स्पष्ट शब्दात फेटाळले देखील आहेत. आता चीनकडून या दाव्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
पण हे वाढीव दावे देखीलपूर्वी इतकेच हास्यास्पद आहेत, असे जयशंकर म्हणाले होते. मात्र त्यावर प्रतिक्रीया देताना चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान यांनी आज पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवरील दाव्याचा पुनरुच्चार केला. या महिन्यात चीकडून चौथ्यांदा अरुणाचल प्रदेशवर दावा सांगितला गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल भेटीचा उच्चस्तरिय निषेध करण्यात आला आहे.