मुंबई – राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना ऐकून १६४ मत मिळाली.
दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. ते पुढे म्हणाले,’विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तसेच,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक असून मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री होते. तसेच 40 पेक्षा अधिक आमदारांचा मला पाठिंबा होता. या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र तरी देखील ते माझ्यासोबतच राहिले. अनेक जण आमच्या संपर्कात 12 आमदार आहेत, 15 आमदार आहेत असा दावा करत होते. आम्ही आमच्यासोबत येण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही. मी तर त्यांना म्हणत होतो, जे आमदार तुमच्यासोबत आहेत त्यांची नावे मला पाठवून द्या मी त्यांना विमानाने मुंबईत पाठवून देतो, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.’