पुणे -पीक कर्जवाटपाची गती वाढविण्यासाठी पीककर्ज मागणी अर्जाच्या सध्याच्या प्रक्रियेत बदल करुन सुधारित आदेश द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बॅंकांतील गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर तलाठी शेतकऱ्यांचे पीककर्ज मागणी अर्ज संकलित करुन तहसिल कार्यालयातर्फे संबंधित बॅंकांमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु, अद्यापपर्यंत राज्यातील अनेक ग्रामपंचायतीत पीककर्ज मागणी अर्ज उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे पीक कर्जवाटपास अद्याप गती मिळालेली नाही.