नवी दिल्ली : केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर अटी व शर्ती शेतकऱ्यांवर का लादण्यात येत असल्याचा प्रश्न शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच कृषी कायदे असल्याचे मत व्यक्त केले होते.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना टिकैत म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरने बंद करावे. जर सरकारला शेतकऱ्यांसोबत संवाद साधायचा असेल तर त्यांनी कोणत्याही अटी ठेवू नयेत. तेव्हाच चर्चा होऊ शकते.
तर कृषिमंत्री तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे रद्द होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आंदोलनकारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला सरकार आजही तयार आहे. पण आंदोलनकारी शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करू नये, असे स्पष्ट केले.
शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत असून सरकार देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकार संघर्ष पेटण्याची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.