मुंबई – भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काल (दि.22) “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. देशातील प्रत्येक नागरिकांकडून या आवाहनाला चांगला पाठिंबा मिळाला. तसेच, बॉलीवुडमधील कलाकारांनीही पंतप्रधानांच्या या आदेशाचे पालन केल्याचे काल दिसून आले.
दरम्यान, यावेळी बॉलिवूडकरांनी टाळ्या, घंटानाद करत जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद दिला. कलाकारांनी त्यांचे टाळ्या, घंटानाद केल्याचे क्षण आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केले आहे.
तसेच, कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री नागरिकांना करत आहेत.