पुणे – देशात करोनाचा संसर्ग वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात 3 मे लॉकडाऊन पुकारला आहे. जीवनाशयक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट देण्यात आलेली आहे. तेथे नागरिक खरेदीसाठी ग्रँडरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण मागील काही दिवसात काही व्यापारी, विक्रेत्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे साहित्य खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे.काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड भागातील, तर, बारामती येथील एका भाजी विक्रेत्याला करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्या भाजीविक्रेत्याच्या संपर्कात आल्याने त्याच्या घरातील लोकांनाही कोरोनची लागण झाली होती.
चाकण परिसरात एका अंडी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना विलगीकरन करण्यात आले होते. तसेच मुंबईमधील व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी साहित्य खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे. याविषयी पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य डॉ. भारत कदम म्हणाले.
बाहेरून आणेलेल्या भाज्या, फळे ही कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात धून घ्यावी. त्यानंतर फळे, भाज्या काही काळ उन्हामध्ये ठेऊन मगच वापरासाठी घ्याव्या. किरणामाल हा देखील काही काळासाठी उन्हामध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी वापरावा. बाजारात खरेदीसाठी गेल्यावर आर्थिक व्यवहार करताना हातमोजे वापरावे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. तसेच एकमेकात अंतर राखणे, गर्दी न करणे हे नियम पाळणे आवश्यक आहे